शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यामधील १,१८१ शेतकरी कुटुंबीयांना सावरले अपघात विम्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले

ठळक मुद्देनुकसान भरपाई : १८९ प्रस्ताव नामंजूर; गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, वयाची अट १० ते ७५, ८८ प्रस्ताव अद्याप प्रलंबित

नितीन काळेल ।सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले असून, १८९ नामंजूर झाले आहेत. विम्यापोटी मिळणारी रक्कम संबंधित शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.दरवर्षी राज्यात विविध अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचा असा अनैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबास हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शासन अशा शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मदत करते; पण अशा शेतकºयांसाठी कोणतेही विमा संरक्षण नव्हते. यासाठी राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपूर्वी शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलण्यात येऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, असे ठेवण्यात आले.एखाद्या अपघातात शेतकºयाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीच्या प्रस्तावानुसार दोन लाख रुपये कुटुंबीयांना मिळतात. तर अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र, ही मदत देण्यात येणारे शेतकरी हे त्यांच्या नावे सातबारा उतारा असणारे आवश्यक आहेत. तसेच संबंधित शेतकºयांचे वय १० ते ७५ असावे, शेतकºयाला मृत्यू, अपंगत्व हे अपघातानेच येणे आवश्यक असावे व तो शेतकरी वाहन चालवित असल्यास परवाना आवश्यक असतो. तसेच रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशक किंवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्यामुळे मृत्यू आदींसाठी हा लाभ मिळतो.सातारा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षांत एकूण १४५८ प्रस्ताव हे अपघात विम्यासाठी कृषी विभागाकडे आले होते. ते सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेले. त्यापैकी ११८१ प्रस्ताव मंजूर झाले तर नामंजूर प्रस्तावांची संख्या १८९ राहिली. तर ८८ प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. जे प्रस्ताव नामंजूर झाले होते, त्यातील २३ हे मंजुरीस योग्य ठरले आहेत. तर मंजुरीस पात्रपैकी १४ प्रस्ताव हे न्यायालयात दाखल केले आहेत.अपघात लाभाचे स्वरूपअपघाती मृत्यू - दोन लाख रुपयेअपघातामुळे दोन डोळे निकामी होणे - दोन लाख रुपयेदोन अवयव निकामी होणे - दोन लाख रुपयेएक डोळा निकामी होणे - एक लाख रुपयेएक डोळा व एक अवयव निकामी होणे - दोन लाखएक अवयव निकामी होणे - एक लाख रुपये

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू